शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पंचगंगा प्रदूषणमुक्ती आपल्याच हातात ! मधुकर बाचूळकर : ‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:48 IST

पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी

ठळक मुद्दे‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणूनपंचगंगा ही गटारगंगा बनली आहे

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी कोल्हापुरात सोमवारी व्यक्त केले.

ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रोटरी क्लब आॅफ करवीर व रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाहू स्मारक भवनात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. बाचूळकर यांनी शिक्षकांना पंचगंगा प्रदूषणाविषयी जनजागृतीचे आवाहन यावेळी केले.

बाचूळकर म्हणाले, पंचगंगा ही गटारगंगा बनली आहे. मैलामिश्रित सांडपाणी, विविध नाल्यांमधून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी तसेच प्लास्टिक, थर्माकोल ही प्रदूषणाची कारणे आहेत. याचबरोबर रंकाळा तलावात मिसळणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे रंकाळासुद्धा प्रदूषित झाला आहे. प्रत्येक शिक्षकाने प्रामुख्याने नदीकाठावरील लोकांमध्ये पंचगंगा प्रदूषणाविषयी जनजागृती करावी.

प्रदूषणामुळे कोणते दुष्परिणाम होतात, याविषयी सूचना करून प्रबोधन करावे; पण पर्यावरणावर काम करणाºया विविध स्वयंसेवी संघटना आणि याप्रश्नी प्रसारमाध्यमांतून झालेल्या लिखाणामुळे गणेश मूर्तिदानचे प्रमाण वाढले आहे, हा आपला विजय आहे.

दुसरीकडे, गणेशोत्सव काळात साउंड सिस्टीमचा वापर करू नका, त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा. फटाक्यांचा वापर कमी करा, फटाक्यांमुळे ध्वनी व जलप्रदूषण होते, ते टाळावे.शौमिका महाडिक म्हणाल्या, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी समाजातील सर्वच घटकांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी राजकारणविरहित एकत्र येऊन काम केले पाहिजे.

पंचगंगा ही माझी आई आहे, असे समजून काम केले, तर प्रदूषणमुक्ती होण्यास फार वेळ लागणार नाही; त्यामुळे आपल्या आईला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे. यावेळी रोटरी क्लब आॅफ करवीरचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी प्रास्ताविक, तर रोटरी चॅरिटेबलचे सचिव एस. एन. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपशिक्षण अधिकारी जे. एस. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरीचे सचिव संजय पाटील, रोटरी चॅरिटेबल करवीरचे अध्यक्ष दिनकर आदिक उपस्थित होते.हे करा...निर्माल्य नदी / तलावात टाकू नका.गणेशमूर्ती दान करा अथवा घरामध्ये बादलीत मूर्ती विसर्जित करा.कोणीही प्लास्टिक पिशवीतून निर्माल्य आणू नका, कापडी पिशवीतून आणा.प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मूर्तीचा वापर करा. प्लॅस्टर आॅफ पॅरिस जलचरांना मारक.घरगुती, मंडळाच्या गणेशमूर्ती कुंडीत विसर्जित करा.गणेशमूर्ती काहिलीमध्ये विसर्जित करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा.नदीकाठावरील नागरिकांमध्ये प्रदूषणविषयी जनजागृती करा.हे घटक प्रदूषणासाठी कारणीभूत...प्लास्टिक, थर्माकोल आणि सांडपाणी, मैलामिश्रितनिर्माल्यगणेशमूर्तींचे रंग रासायनिक असतात. ते घातक आहेत; त्यामुळे मूर्ती दान करा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण